काय म्हणताय आराम सुरू आहे!
एक पुणेकर ः
पुण्यातल्या अतिप्रतिष्ठित आणि प्रशस्त नगरीत म्हणजेच सदाशिवपेठेत राहणारे आबा तळहातावर चिमुटभर तंबाखू चोळत म्हणाले, आजकाल महागाई फारच वाढलीय. साधा तंबाखू खावा म्हटलं तरी हाताला घाम फुटतो आणि चुन्याचे पैशे वाचतात. असो पैसे वाचतात यांचंच काय ते समाधान. हल्ली महागाई ऐवढी वाढली आहे की बाजारात जावं भोपळा घ्यायला आणि करवंदांच्या आकाराचे बटाटे घेऊन परतावं. यांची भाजी केल्यावरही हीला विचारावं लागतं की भाजी कोणती आहे. आता या महागाईच्या विषयावरही इलेक्शन होऊ शकतं, हे कमालच आहे बुबा. म्हणे विकासावर इलेक्शन लढविणार. यांच्या बापानं तरी विकास पाहिला होता का? कसला करता पुण्याचा विकास, पार खड्डयातच टाकलेय पुण्याला. एकेकाळी सदाशिव पेठ म्हटली की अवघ्या पुण्याचे दर्शन व्हायचं. आता तर वीस किलोमिटरचा परिसर पालथा घातला तरी पुणं डोळ्यात मावत नाही. आता येवढ्या मोठ्या पुण्याचा विकास करणार, आणि तेही हे चिंधिचोर, राजकारणी. इलेक्शन आले की वाड्यांचे उंबरठे घासणारे हे.... यांना काय कळणार सदाशिवपेठी पुणेकरांच्या व्यथा. यांचं काम झालं की हे साधा ओळखीचा हातही वर करीत नाही, की खुशालीही विचारीत नाही. असं म्हणून आबानं तळहातावर उरलेल्या तंबाखूच्या काही काड्या झटकून राहिलेला तंबाखू जिभेखाली सरकवला. तंबाखू आत जाताच त्यांचा चेहरा समाधानाने फुलला. स्वर्गाधिपती इंद्राच्या दरबारात नृत्याचा आनंद लुटत, दारूचा ग्लास तोंडाला लावत बसलेल्या दरबाऱ्यांसारखे आपल्या हात मोडलेल्या मोडक्या खूर्चीवर बसत आबा म्हणाले, अरे आपले तासगावचे आबा म्हणे वैशनौदेविला गेले आहे....पवारांना पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसलेले बघण्यासाठी साकडं घालणार आहे, म्हणे. आता आपले आबा तसे भोळेच म्हणा. त्यांना काय ठाऊक पंतप्रधानपदासाठी कोणकोणत्या देवि-देवतांना साकडे घालावे लागते, ते. ममता, असो की माया, म
ाया असो की जैललीता सर्वांना सारख्याचा ममतेनी माया लावावी लागते...आणि श्रद्धेने नैवद्य द्यावा लागतो. नाहीतर बाजपेयींसारखं व्हायचं. त्यांना काही जमलं नाही, या बायांना कसं नाचवावं ते, अनुभव कमी पडला. पण पवार मात्र करतील बरं का...असं म्हणताच बायकोची हाक कानावर पडली. तिला ओ देतच ते खूर्चीवरून उठले आणि स्वयंपाक घराकडे वळले. आता त्यांची फक्त वाकलेली पाठ.... आणि खाली आलेली मान दिसत होती....
पुण्यातल्या अतिप्रतिष्ठित आणि प्रशस्त नगरीत म्हणजेच सदाशिवपेठेत राहणारे आबा तळहातावर चिमुटभर तंबाखू चोळत म्हणाले, आजकाल महागाई फारच वाढलीय. साधा तंबाखू खावा म्हटलं तरी हाताला घाम फुटतो आणि चुन्याचे पैशे वाचतात. असो पैसे वाचतात यांचंच काय ते समाधान. हल्ली महागाई ऐवढी वाढली आहे की बाजारात जावं भोपळा घ्यायला आणि करवंदांच्या आकाराचे बटाटे घेऊन परतावं. यांची भाजी केल्यावरही हीला विचारावं लागतं की भाजी कोणती आहे. आता या महागाईच्या विषयावरही इलेक्शन होऊ शकतं, हे कमालच आहे बुबा. म्हणे विकासावर इलेक्शन लढविणार. यांच्या बापानं तरी विकास पाहिला होता का? कसला करता पुण्याचा विकास, पार खड्डयातच टाकलेय पुण्याला. एकेकाळी सदाशिव पेठ म्हटली की अवघ्या पुण्याचे दर्शन व्हायचं. आता तर वीस किलोमिटरचा परिसर पालथा घातला तरी पुणं डोळ्यात मावत नाही. आता येवढ्या मोठ्या पुण्याचा विकास करणार, आणि तेही हे चिंधिचोर, राजकारणी. इलेक्शन आले की वाड्यांचे उंबरठे घासणारे हे.... यांना काय कळणार सदाशिवपेठी पुणेकरांच्या व्यथा. यांचं काम झालं की हे साधा ओळखीचा हातही वर करीत नाही, की खुशालीही विचारीत नाही. असं म्हणून आबानं तळहातावर उरलेल्या तंबाखूच्या काही काड्या झटकून राहिलेला तंबाखू जिभेखाली सरकवला. तंबाखू आत जाताच त्यांचा चेहरा समाधानाने फुलला. स्वर्गाधिपती इंद्राच्या दरबारात नृत्याचा आनंद लुटत, दारूचा ग्लास तोंडाला लावत बसलेल्या दरबाऱ्यांसारखे आपल्या हात मोडलेल्या मोडक्या खूर्चीवर बसत आबा म्हणाले, अरे आपले तासगावचे आबा म्हणे वैशनौदेविला गेले आहे....पवारांना पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसलेले बघण्यासाठी साकडं घालणार आहे, म्हणे. आता आपले आबा तसे भोळेच म्हणा. त्यांना काय ठाऊक पंतप्रधानपदासाठी कोणकोणत्या देवि-देवतांना साकडे घालावे लागते, ते. ममता, असो की माया, म
ाया असो की जैललीता सर्वांना सारख्याचा ममतेनी माया लावावी लागते...आणि श्रद्धेने नैवद्य द्यावा लागतो. नाहीतर बाजपेयींसारखं व्हायचं. त्यांना काही जमलं नाही, या बायांना कसं नाचवावं ते, अनुभव कमी पडला. पण पवार मात्र करतील बरं का...असं म्हणताच बायकोची हाक कानावर पडली. तिला ओ देतच ते खूर्चीवरून उठले आणि स्वयंपाक घराकडे वळले. आता त्यांची फक्त वाकलेली पाठ.... आणि खाली आलेली मान दिसत होती....


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home